करबुडे येथील घर खरेदी प्रकरणातून कुटुंबाला मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल..

रत्नागिरी :- तालुक्यातील करबुडे येथे तोंडी करार केलेल्या घर खरेदीच्या एकूण रकमेपैकी ५० हजार देऊन घरात राहणाऱ्या कुटुंबाला चारजणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीची ही घटना गुरुवार २५ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली . मनोहर भगवान जाधव , मनोहर जाधवची पत्नी , प्रतीक मनोहर जाधव आणि अन्य एक अज्ञात मुलगा ( सर्व रा . करबुडे धनावडेवाडी , रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत . त्यांच्याविरोधात अभिषेक सहदेव पवार ( रा . करबुडे धनावडेवाडी , रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . त्यानुसार , फिर्यादी आणि आरोपींमध्ये घर विकत घेण्याबाबत तोंडी करार झाला होता . एकूण रकमेपैकी ५० हजार रुपये संशयितांना फिर्यादींनी देउन एक महिन्यांपूर्वी ते आपल्या कुटुंबासह त्या घरात रहाण्यासाठी आले होते . दरम्यान , दि . २५ जुलै रोजी चारही संशयितांनी त्या घरी यऊन तू आताचे आता घर खाली कर , असे बोलत फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली . त्या नंतर मनोहर जाधवने अभिषेक पवार यांच्या डोक्यात लोखंडी पकडीने मारुन दुखापत केली . त्यावेळी फिर्यादीची आई , पत्नी त्यांचा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असता संशयिताने त्यांना पक्कड आणि घरातील पाळणा उगारत मारहाण केली . त्या नंतर संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली . या प्रकरणी संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ ( १ ) , ११५ ( २ ) , ३५२ , ३५१ ( २ ) ( ३ ) , ३२४ , ( ४ ) ( ५ ) , ३ ( ५ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दखल न्यूज महाराष्ट्र .

जाहिरात

Exit mobile version