भारतानं पाकिस्तानला लोळवलं; भारताच्या विजयाला तोड नाही; भारतीय संघाला शुभेच्छा,” राज ठाकरे यांचे ट्विट.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणजे क्रिकेट प्रेमींना पर्वणीच आणि त्यात दिवाळीच्या तोंडावर भारतीय संघाचा पाकिस्तानवर विजय म्हणजे दुग्ध शर्करा योगच. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
“पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा,” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.


टी-२० वर्ल्डकपमध्ये काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला लोळवत विजय मिळवला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांच्या भेदक गोलंदाजीनंतर, विराट आणि पांड्या यांची शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर देशभरात जोरदार जल्लोष सुरू आहे. यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version