राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा येळवण नं १ ला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने येळवण गावा तर्फे शाळेचा अमॄत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे
यासंदर्भात नुकतीच ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांची बैठक पार पडली. त्यामध्ये अमॄत महोत्सवी समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी विश्वनाथ लाड यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र आयरे , गणपत मिशाळ व दशरथ जाधव यांची तर सचिवपदी मुख्याध्यापक प्रमोद जाधव, सहसचिव संतोष लाड, खजिनदार सहशिक्षक विशाल घोलप व दिपाली जाधव, सहखजिनदार सौ. प्रमिला आयरे तर प्रसिद्ध प्रमुख विठोबा चव्हाण व विकास फाकांडे, यांची निवड करण्यात आली सल्लागार म्हणून चंद्रकांत देशपांडे, वासुदेव चव्हाण, दामोदर जाधव, ॲड रघुनाथ लाड, सिताराम जाधव, भिकाजी मलुष्टे, तुकाराम धावडे, सुरेश चाळके, रमेश मालप,केशव मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. या अमॄत महोत्सवी सोहळ्यानिमित्त जेष्ठ नागरिक,माजी विद्यार्थी, माजी सैनिक,कवी,अभिनेता, नाट्य लेखक, दिग्दर्शक, अधिकारी, पदाधिकारी, विशेष प्राविण्य मिळवलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार या शाळेत काम केलेले माजी शिक्षक यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे हा अमॄत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे