बातम्या

रत्नागिरीतील लाभार्थ्यांनी ‘धन्यवाद मोदी’ आशयाचे मोदीजींना पाठवली पत्र.या अभियानाच्या सहसंयोजिका सौ.शिल्पा मराठे यांचा पुढाकार.

रत्नागिरी : मा. पंतप्रधान नेरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनां मधील अनेक योजना गावा-गावातील वाडी, वस्ती पर्यत पोचल्या आहेत. या योजनांचा लाभ देशातील जनतेला होत आहे. अश्या अनेक योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थीनी ‘धन्यवाद मोदीजी’ या आशयाचे पत्र या अभियानात भाग घेऊन पंतप्रधान मोदीजींच्या ज्या योजनेचा लाभ मिळाला त्या बद्दल धन्यवादाचे पत्र लिहून पाठवले.


           अनेक योजनांचा लाभ घेतलेले अनेक लाभार्थी आज रत्नागिरीतील वार्ड क्र. 3 व 4 मधील लाभधारक  उत्स्फूर्त पणे या ठिकाणी उपस्थित होते.
या वेळी पंतप्रधानांनी  राबिलेल्या जनकल्याण कारी योजनांची माहिती जिल्ह्याच्या जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस (द.) रत्नागिरी तसेच या उपक्रमाच्या सह-संयोजक सौ.शिल्पाताई मराठे यांनी उपस्थित लाभार्थीना दिली. या कार्यक्रमात उपस्थित राहून अधिक माहिती दिल्याबद्दल उपस्थितांनी सौ.शिल्पा मराठे यांच्याकडे  लाभार्थींनीं लिहिलेली धन्यवादाची पत्र जमा केली तसेच आभार मानले. रत्नागिरी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपकजी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे.
         पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार मार्फत राबवण्यात आलेल्या जन आरोग्य योजना, मोफत धान्य योजना, मोफत लसीकरण योजना, पंतप्रधान आवास योजना, यांसारख्या असंख्य योजनांचे लाभार्थी या ठिकाणी एकत्र येत मोदीजींना सामूहिक रित्या धन्यवाद देणारे पत्र या ठिकाणी पाठवण्यात आले. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!